घराच्या चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा असतात.
त्यापैकी उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेला जास्तीत जास्त उतार असावा, पाणी असावे, खिडक्या, दरवाजे हे असल्यास अत्यंत शुभ फलदायी ती वास्तू असते. त्याचविरुद्ध दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम दिशेला कमीतकमी खिडक्या असाव्यात,जास्तीतजास्त चढ असावा, उतार अजिबात नको, पाणी अजिबात नको चुकीच्या अशा वास्तूच्या प्लॅनमधे किंवा त्या घरामध्ये त्या लोकांना जरा जास्तच संघर्ष करावा लागतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुध्दा जास्तच संघर्ष असतो, त्यामधे लोक धार्मिक वृत्तीची नसतात.